चंद्रपूर :7 एप्रिल 2025
(सुशांत घाटे )
कर्म आणि धर्म ची व्याख्या स्वीकारत स्वतःच्या अष्टपैलू नेतृत्वात, स्वतःचा विध्यार्थी दशेतुन तुफान इतिहास घडवणारा, एक आत्म निर्भर उमदा नेता आणि चाणक्य दृष्टीला ही मागे टाकेल असा राजकारणातला एक धुवाधार, अभिनव्य नाव ते “सुधीर मुनगंटीवार” यांचे, ना मोह, ना लालच, सत्ता आली तर माजायचं नाही आणि गरिबी आली तर लाजायचं नाही असं धोरण!
बऱ्याच कालावधी नंतर चंद्रपूर जिल्ह्यात राजकारणात बडेच डाव पेच सध्या राजकीय खेळले जात आहे!
कधी कार्यकर्त्याच्या माध्यमातून तर कधी महोत्सव च्या माध्यमातून
राज्याच्या प्रमुख स्थानी आपला निर्वाह ठेवणाऱ्या मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळातुन डावलले जरी गेले असले तरी मात्र जनतेच्या मनातून ते कधीही न सुटणारे कोडे आहे.
विकासाच्या परीभाषेची मांडणी करणारा, राजकारणातील दूरवरचा चेहरा च नाही, तर ठाम पणे उभा राहून दिला शब्द केला पूर्ण म्हणून त्यांची खास ओळख आहे!
चंद्रपूर जिल्ह्याला मंत्री मंडळात स्थान न देण्याचा मानसपणा राजकारणात घेतलेला बळी च मानावा लागेल!
पण जिल्ह्याला फक्त या राजकारणात वजा करणाऱ्याचा अजून हिशोब बाकी ठेवणाऱ्या विकासाला मुनगंटीवार नक्कीच भेदणार हे तितकेच खरे!
सुरवातीच्या राजकारणातून बाद झालेले व्यक्तिमत्व सध्या टांगा वर करून मुनगंटीवार विरोधी धोरण स्वीकारात आहे. स्वतःच्या कार्यशैलीत सबशेल फेल ठरलेले नेते दिल्ली, मुंबई दरबारीं मुकुट स्थापन करून आत्मनिर्भर करीत आहे!
- कार्यकर्त्यांची फळी नसणाऱ्या नेत्यांची, तसेच कितीतरी दिवस अंडर ग्राउंड असलेली नेता चमत्कारीक भाष्य सध्या ठोकत आहे!
जेव्हा गरज पडते, तेव्हा पाठ दाखवणाऱ्या नेत्यांची चंद्रपूर जिल्हायात कमी नाही आहे, स्वतःच्या वयक्तिक फायद्यासाठी टाहो फोडणाऱ्या नेत्यांना रात्रीची झोप सुद्धा नाही येत आहे?
मात्र आनंदादायी अवस्थेत असणाऱ्या मुनगंटीवार यांना जिल्ह्यातील रान पेठून दिसताच ते
आपल्या बालेकिल्यातुन जागृत होत कामाला लागतात,
नव्याने उगम झालेल्या नेत्याने तर चक्क चालेंज थीम दिल की काय? - बॅनर चे पूर्ण शहर भर होर्डिंग लावून मीच राजा करीत आपला प्रचार केला आहे!
पण वस्तुस्थितीला कोणीही भेदू शकत नाही विकासाचा डावपेच आखणारा आणि कुठेही उणीव्हा न जाणवू देणारा या जिल्ह्यातील एक च नाव आज ही गाजत आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचे! - राज्याच्या केंद्र स्थानी असणाऱ्या या नेत्याला डावल्ण्याचा मानस बिंदू ठेवणाऱ्या,त्या नेत्यांना लवकरच अद्दल घडेल, विकासाच्या महापुरुषाला बाहेर नाही तर विरोधकांना मुनगंटीवार आपल्या वाणीतून बाहेरचा रस्ता नक्की दाखवतात हे तितकेच खरे!
जिल्ह्यातील राजकारणाच्या द्विभाषिक यात्रेला सध्या सुरुवात आहे. मात्र योद्धा म्हणून लढवैयाय राजकारणातील मुनगंटीवार हे नक्की मैदान जिंकेल हा त्यांचा विश्वास जनतेला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

